शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

वसई-विरार उपप्रदेशात आरक्षित जमिनीची ऐशी-तैशी

By admin | Published: August 12, 2015 11:11 PM

सार्वजनिक हितासाठी आरक्षित झालेल्या जमिनी संपादित न केल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य व अन्य बाबींसाठी या जमिनी

वसई : सार्वजनिक हितासाठी आरक्षित झालेल्या जमिनी संपादित न केल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य व अन्य बाबींसाठी या जमिनी आरक्षित करण्यात आल्या. परंतु, त्या ठरावीक मुदतीत संपादीत न केल्यामुळे सध्या या जमिनींवर समाजकं टक सरसकट अनधिकृत बांधकामे करीत आहेत. वसई-विरार शहराच्या पूर्वेस अशा आरक्षित जमिनी मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी गिळंकृत केल्या.केंद्र सरकारने यापूर्वी आरक्षित केलेल्या जमिनी संपादीत करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. परंतु, नव्या सरकारने ही मुदत १० वर्षांपासून १२ वर्षांपर्यंत वाढविली आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. यापूर्वी सार्वजनिक हितासाठी अनेक जमिनी आरक्षित करण्यात आल्या. वसई-विरार उपप्रदेशात सिडको प्राधिकरण कार्यरत असताना तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात विविध उद्देशांसाठी जमिनीवर आरक्षणे टाकण्यात आली. परंतु, कालांतराने या आराखड्यातील आरक्षणे बदलली गेली तसेच काही आरक्षित जमिनी समाजकंटकांनी गिळंकृत करून त्यावर सरसकट अनधिकृत बांधकामे उभारली. वसई-विरार पूर्वेस विकास आराखड्यात असलेल्या रस्त्याच्या आरक्षित जागेवर आजमितीस शेकडो इमारती बांधण्यात आल्या आहेत. असाच प्रकार पालघर शहरातही पाहावयास मिळतो. जमिनी अशा प्रकारे गिळंकृत झाल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशामध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पराकोटीला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जमीन संपादन करण्याची मुदत केंद्र सरकारने २ वर्षांनी वाढविल्यामुळे भविष्यात या जमिनी सार्वजनिक उद्दिष्टांसाठी शिल्लक राहणार नाहीत, अशी सर्वत्र चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)