शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वसईत अव्वाच्या सव्वा दराने भाजीविक्री

By admin | Published: August 11, 2015 11:29 PM

वसई-विरार परिसरात भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्व भाज्या १०० ते १५० रू. किलो या दराने विकण्यात येत आहेत. एकीकडे मच्छीचे मार्केट ओस पडले असताना भाज्यांचे भावही

वसई : वसई-विरार परिसरात भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्व भाज्या १०० ते १५० रू. किलो या दराने विकण्यात येत आहेत. एकीकडे मच्छीचे मार्केट ओस पडले असताना भाज्यांचे भावही चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे नागरीकांना सध्या अव्वाच्या सव्वा दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.वसई विरार परिसरातील भाजी मार्केटमध्ये नाशिक, कळंब, अर्नाळा, पालघर व डहाणू या भागातून भाजीपाला येत असतो. मध्यंतरीच्या काळात भाज्यांचे भाव घसरले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून भाज्यांच्या दराने अचानक उसळी घेतली. हिरवा वटाणा १६० रू. किलो, कांदा ४० रू. किलो, टॉमेटो ३० ते ३५ रू. किलो, कोबी, घेवडा, गवारी, भेंडी, दुधी, भोपळा प्रत्येकी १०० रू. किलो या दराने विकण्यात येत आहे. त्यामुळे भाज्यांनाही मागणी कमी प्रमाणात होत आहे. मच्छीमार्केट ओस पडले आहेत त्यामुळे भाज्यांना चांगली मागणी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाज्यांच्या चढ्या दरामुळे ग्राहकवर्ग फिरकत नसल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.भाज्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. मनमानी पद्धतीने दर लावण्यात येतात. अन्य पर्याय नसल्यामुळे भाज्या खरेदी करणे भाग असते. बाहेरून येणाऱ्या भाज्यांचा दर अधिक असल्यामुळे स्थानिक भाजीविक्रेतेही त्याच दराने आपली भाजी विकत असतात. - सुनिला यादव, विरारघाऊक बाजारातच चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागते. या भाज्या ने-आण करणे, त्यावर येणारा खर्च वाढतो आहे. भाज्यांची आवक कमी झाली कि दर वाढतात ही वस्तुस्थिती आहे. सध्या घाऊक विक्रेतेही बाहेरून येणाऱ्या भाज्यांच्या दराशी बरोबरी करून विक्री करू लागल्यामुळे भाज्या महाग झाल्या आहेत हे खरे आहे.- शामसुंदर पासवान, भाजीविक्रेता