शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:00 PM

२५ टक्केच साठा : सूर्या-धामणी, पेल्हार व उसगाव धरणातील पाणी आटले

आशिष राणे वसई : राज्य हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे ७ जून रोजी होणारे आगमन आठवडाभर लांबले असल्याने साधारण १५ जून नंतरच वरुणराजा सर्वत्र बरसेल असे चित्र आहे. मात्र या दरम्यानच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरी व ग्रामीण भागात जाणवण्याची चिन्हे आहेत.

दि. ३१ मार्च अखेरीसपर्यंत वसई-विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणात एकूण ४७.४३ टक्के असा मुबलक साठा असल्याची अधिकृत आकडेवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिल्यावर मुबलक साठा असल्याने यापुढे ही वसईत पाणीकपात होणार नाही असे ही त्यावेळी महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र आताच्या परिस्थितीत दोन महिन्यात धरणातील पाणी साठा घटल्याने ताज्या आकडेवारीनुसार वसईकरांनो पाणी जपून वापरा, असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दि.१ जूनपर्यंत धरणात सरासरी २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पालघरसहित वसई तालुक्यातील या तीन धरणांचा एकूण साठा सरासरी २५ टक्के इतका राहिला असून यामध्ये मुख्य सूर्या-धामणी धरणात आता केवळ २०.०२ टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला असून ही बाब वसईकरांच्या दृष्टीने चिंतेची आहे. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे, या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा मार्च अखेरीसपर्यंत धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंताकडून सांगण्यात आले. असले तरी आता दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा व त्याची पातळी बºयापैकी खालावली आहे.

पाऊस लांबल्यास पाणीकपात अटळवसई -विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा- ३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन उचलायला मिळत असते. मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई भासली होती. तशी गतवर्षी सुद्धा जुलै-२०१८ व सप्टेंबर नंतर पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. परंतु यंदा पालिकेने पाण्याचे उचित असे नियोजन केल्याने व अमृत योजना ही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने यावेळी धरणात पाण्याचा साठा अजून ही तसा समाधानकारक आहे.याउलट बहुतांशी गंभीर स्थिती पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असून जिल्ह्यातील अनेक गावांना अजून ही पुढील १५ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर सर्वत्र मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तीन धरणातील १ जूनपर्यंत शिल्लक पाण्याची आकडेवारीवसई- विरार शहराला मुख्य अशा सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणाच्या माध्यमाने नियमित पाणीपुरवठा होतो. त्यातच मागील वर्षीपासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद करण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फार असा फरक पडणार नाही.जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यातच आपल्या शहरी भागात पाणी पुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात आज १५ जून अखेरपर्यतही कमी का होईना मात्र अजूनही पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणी