शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:18 IST

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पालघर : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वनगा यांनी भूमीपुत्रांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.तलासरी तालुक्यातील कवाडा या अत्यंत दुर्गम आदिवासीबहुल पाड्यावर १ जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. माजी खासदार व नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, माधवराव काणे व प्रभाकर रेगे यांच्या तालमीत ते वाढले. त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मुंबई विद्यापीठातून बीए व त्यानंतर त्यांनी एलएलबी पूर्ण केले. १९७९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. श्रीनिवास मोडक यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वकिली हा पेशा न ठेवता त्यांनी समाज बांधवांचे अनेक खटले मोफत लढविले. त्यांनी जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, तलासरी, सिल्व्हासा येथील आदिवासींचे प्रश्न सोडविले. पुढे जव्हारला स्वत:चे कार्यालय स्थापून १९८० पासून स्वतंत्रपणे वकिलीला सुरूवात केली. त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालय अशी १९८० ते ९६ पर्यंत वकिली केली.खा. चिंतामण वनगा १९८२ ते ८४ भाजपचे जिल्हा चिटणीस तर १९८४ ते ८६ या काळात ते भाजपा युवा मोर्चाचे चे प्रदेश सचिव होते. १९८७ ते १९९० ते जव्हार तालुकाध्यक्ष होते. १९९५ पर्यंत ते भाजपाच्या आदिवासी आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाने त्यांना १९९७ साली भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले.दिल्लीत मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शनडॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयात वनगा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराजे अत्राम आदींनी श्रद्धांजली वाहिली.वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते.- नितीन गडकरी,केंद्रीय परिवहन मंत्रीत्यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले. आम्ही एकत्र काम करायचो. वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळा त्यांनी सुरु केल्या.- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री१९९६ पासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पावती म्हणूनच ते तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्रींभाजपाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगा