शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

वाळूउपसा रोखणार कधी?

By admin | Published: January 02, 2017 3:35 AM

तालुक्यातील पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीतून पीक व मलवाडा गावांच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा अगदी राजरोसपणे सुरु असून ती रोखण्यासाठी अनेकदा हाती

वाडा : तालुक्यातील पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीतून पीक व मलवाडा गावांच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा अगदी राजरोसपणे सुरु असून ती रोखण्यासाठी अनेकदा हाती घेतलेली मोहीम निष्पळ ठरली आहे. काही दिवसांपूर्वी पीक ग्रामपंचायतीने रेतीउपसा बंदीचा ठराव देखील मंजूर केला होता. मात्र आता पुन्हा रेतीउपसा सुरु झाला असून मलवाडा गावाच्या हद्दीतून वाळू वाहतूक केली जात आहे. मात्र विक्रमगड महसूल विभाग डोळ््यावर पट्टी बांधून असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.पिंजाळ नदीवर पीक व मलवाडा गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळूउपासा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याने निसर्गाने नटलेल्या या नदीचे अस्तित्व संपुष्टात येते आहे. यानंतर वनविभागाने कार्यवाही केल्याने धाबे दणाणलेल्या वाळू तस्करांनी आपला मोर्चा मलवाडा हद्दीकडे वळवला असून तेथून आताही बेसुमार वाळूउपसा सुरु आहे. रात्री मलवाडा मार्गे या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसूल विभाग मात्र आपल्या हद्दीच्या अडचणी दाखवून कारवाई टाळत आहेत. हद्द कुठलीही असली तरी याचा फटका मात्र जवळपास ५ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याला बसणार असल्याने तालुक्याच्या हद्दीचा विचार न करता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.पिंजाळ नदीवर दिवसा होणारा वाळूउपसा महसूल विभागाच्या लक्षात आणून सुद्धा कुठलीही कारवाई का झाली नाही. यात अधिकाऱ्यांचे हात ओले होतात का? असा सवाल नागरिकांनी केला असून या प्रकरणी लक्ष घालून पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पिंजाळ नदी वाळू तस्करांच्या तावडीतून पूर्णत: मुक्त करावी आता या प्रशासनाविरोधात उपोषण केले जाईल असे प्रविण पांडुरंग पाटील यांनी सांगितले.या वाळू ठियांचा लिलाव झाला आहे काय असल्यास कधी? आणि किती रकमेला झाला आहे. किती ब्रास वाळू काढण्याची परवानगी आहे, व किती काढली जाते आहे. याची वाहतूक परवान्यानुसार होते का? याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)