शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रस्त्यावरील झाडे कापण्याची जबाबदारी कुणाची?

By admin | Published: July 30, 2015 10:32 PM

पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या

डहाणू : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर येत आहेत. वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या फांद्या तुटून नागरिकांचा बळी जातो. अशा दुर्घटना वारंवार होऊनही झाडे छाटण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना पावसाळ्यात बाहेर पडणे भीतिदायक वाटते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यासाठी जिल्ह्यात विशेष शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून होत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी, जव्हार, सूर्यानगर, चारोटी, कासा, वानगाव, धा. डहाणू या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला हजारो झाडे १०० वर्षांपूर्वीपासूनची आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यास याचा धोका वाढतो. जून, जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसात हजारो झाडे तुटून तसेच जमिनीतून उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, डहाणू, मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर झाड पडून ते जागीच ठार झाले. तर पालघर, शिरगाव येथे जुने झाड कोसळून प्रकाश माळी (५०) या तरुणाचा बळी गेला. अशा अनेक घटना रस्त्यावरील झाडांमुळे घडत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सडून, कुजून, अचानक तुटून विजेच्या तारांवर पडून अनेक वेळा मोठा अपघात होता-होता वाचला आहे. तरी, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कापण्याची जबाबदारी सक्षम शासकीय यंत्रणेवर सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)