शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची गळती चिंताजनक स्थितीत

By admin | Published: July 27, 2015 3:06 AM

दर जून व जुलै महिन्यांत पंचायत समित्यांचा शिक्षण विभाग आपापल्या तालुक्यांतील बोगस शाळांची यादी जाहीर करत असतो. ही प्रथा गेली अनेक

दीपक मोहिते, वसईदर जून व जुलै महिन्यांत पंचायत समित्यांचा शिक्षण विभाग आपापल्या तालुक्यांतील बोगस शाळांची यादी जाहीर करत असतो. ही प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. यादी प्रसिद्ध झाली की, दोन दिवस चर्चेला उधाण येते. त्यानंतर, मात्र सर्वत्र शांतता. अशा शाळांवर कारवाई का होत नाही, या प्रश्नाचे उत्तरदेखील वर्षानुवर्षे मिळू शकले नाही. शिक्षण विभाग स्वत: या याद्या प्रसिद्धीस देत असतो. मात्र, कारवाईबाबत विचारणा केल्यास अधिकाऱ्यांकडून मौन बाळगण्यात येते. त्यामुळे या सर्व गैरप्रकारास अधिकाऱ्यांकडूनही संरक्षण दिले जात असावे, असा संशय बळावतो. शाळा बोगस असतानाही संस्थाचालक मनमानीपणे तुकड्या वाढवतात. तसेच या मंडळींचा पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागामध्ये चांगला राबताही असतो.एकीकडे शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे बोगस शाळांचे पीक सतत वाढत आहे. शिक्षणमंत्रीच बोगस पदवीच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करणे मुळातच चुकीचे आहे. अशा शाळांमुळे जि.प.च्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली आहे. अनेक जि.प. शाळा बंद पडल्या आहेत, तर अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना त्याच्याशी कोणतेही देणेघेणे नाही. अशा बोगस शाळांचे संस्थाचालक हे शाळांच्या भव्य वास्तू, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रशिक्षण आदी सोयीसुविधा उपलब्ध करीत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची फसगत होते.वास्तविक, अशा प्रकरणामध्ये पालकवर्गही तेवढाच जबाबदार आहे. बोगस शाळांच्या यादीमध्ये आपल्या मुलाच्या शाळेच्या नावाचा समावेश असल्याचे कळल्यानंतरही ते पालकांच्या बैठकीत संस्थाचालकांकडे विचारणा करीत नाही, याला काय म्हणावे?