शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी गाठला तळ!

By admin | Published: April 06, 2017 2:04 AM

तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

निनाद देशमुख - रिसोडतालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहेत. यापैकी नेतन्सा लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात १०.९६ टक्के जलसाठा आहे. याप्रमाणे कोयाळी संग्राहक तलावात १६.५६ टक्के, मोरगव्हाण प्रकल्पात २.३१ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ३५.६३ टक्के तर कुकसा प्रकल्पात ४७.९८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित बोरखेडी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, हराळ, जवळा, करडा, कोयाळी, मांडवा, पाचंबा, वाघी, वरूड बॅरेज या प्रकल्पांनी तळ गाठला असून, जलसाठा शून्यावर आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतूमानात बदल होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली; मात्र प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, जलप्रकल्पांत पुरेसा जलसाठा नव्हता. आता तर तब्बल १२ प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आहे. केवळ पाच प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यामुळे पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. जलपातळी खालावत असल्याने आणि मोजक्याच जलाशयांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे.