शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

१७ पैकी १३ प्रकल्प कोरडेठण्ण !

By admin | Published: May 07, 2017 7:26 PM

१७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे.

रिसोड : तालुक्यातील १७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे. केवळ दोन प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यंदा जिल्हाभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या दाहकतेचा सर्वाधिक फटका रिसोड तालुक्यात दिसून येत आहे. भूगर्भातील पाणी पातळी देखील कमालीची खालावल्याने विहीरी, हातपंप, कूपनलीका आटल्या आहेत. त्यामुळे रिसोड शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पावसाळ्याला अजून बराच अवधी असल्याने भविष्यात पाणी समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.  निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी नाल्यासह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडतात. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, प्रकल्प परिसरात पाऊस समाधानकारक नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. आता तर तब्बल १३ प्रकल्प कोरडेठण्ण असून, दोन प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. जलपातळी खालावल्याने आणि जलाशयांमध्ये जलसाठा नसल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. तालुक्यातील नागरिकांना उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके असह्य करून सोडत आहेत. पाणीटंचाईच्या आगीत नागरिक होरपळत असतानादेखील संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करीत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे.