शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

ग्रामपंचायतींसाठी १८ कोटींचा निधी

By admin | Published: March 13, 2017 2:21 AM

वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना होणार लाभ.

वाशिम, दि. १२- शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले असून, वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसाठी दुसर्‍या टप्प्यातील १८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. या निधीचे लवकरच ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे. ह्यआमचं गाव -आमचा विकासह्ण या उपक्रमांतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून भरघोष निधी मिळणार आहे. हा निधी कोणत्या बाबींवर खर्च करावा, यासाठी सन २0१६ मध्ये जून व जुलै महिन्यात गावनिहाय बैठका, सभा घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून कृती आराखडे बनविण्यात आले. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्ह्यात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही केल्या होत्या. ग्रामसभेने कृती आराखडा मंजूर केल्यानंतर निधीेंचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले. सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ४९१ ग्रामपंचायतींना १८ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वाटप करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यातील १८ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा होती. हा निधी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाला असून, लवकरच या निधीचे ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. सन २0१५-१६ या वर्षात ४९१ ग्रामपंचायतींना २६ कोटी रुपयांच्या निधीचे थेट वाटप केले होते. ग्रामसभेने मंजुरात दिलेल्या कृती आराखड्यातील कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा हा निधी ग्रामपंचायतींना थेट पुरविला जात आहे. या निधी खर्चाचे लेखा परीक्षणही ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे.