शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाशिम जिल्ह्यातील २८८ युवक आत्मनिर्भर; १६.७९ कोटी रुपयांचे कर्जवाटप

By दिनेश पठाडे | Updated: March 13, 2023 15:31 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

वाशिम : मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, युवक सक्षम बनावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे कर्जदारांना केवळ मुद्दल भरावी लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, यासाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविली जाते. या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने युवकांना व्यवसाय उभारता येत आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. 

महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण, नियमित कर्जफेड करणाऱ्यास मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा  १५ लाखापर्यंत केली आहे. या अंतर्गत व्याज परतावा ४ लाख ५० हजार मर्यादेत केला जात आहे. जिल्ह्याला २०२२-२३ या आर्थिक वर्षात किमान ३०० कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २८८ जणांना कर्जवाटप करण्यात आले आहे. महामंडळामार्फत कर्जाचा लाभ घेण्यासाठी ८१७ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी २८८ लाभार्थींना त्या-त्या बँकेकडून कर्ज मिळाले. बँकेत असलेले प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.

१.६४ कोटींचा व्याज परतावाअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपये कर्जापर्यंत व्याज परतावा ४ लाख ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत केला जातो. आतापर्यंत महामंडळाने व्याज परताव्यापोटी १ कोटी ६४ लाख ५९ हजार ९८२ रुपये बँकांना अदा केले आहेत. 

टॅग्स :washimवाशिम