शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५.१४ कोटींचा निधी

By दिनेश पठाडे | Published: June 07, 2023 6:17 PM

...अखेर  नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वाशिम : जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानानंतर वेळो वेळी शासनस्तरावर निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडून निधी मंजूर केला जात आहे. मार्च महिन्यात व  ७ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या नुकसानभरपाईचा निधी यापूर्वीच जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता एप्रिल अखेर  नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे पीक नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या टप्प्यात यापूर्वी निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ ते ३० एप्रिल यादरम्यान झालेल्या नुकसान म्हणून शासनाने निधी मंजूर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २९७३.५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ५ हजार २२ शेतकऱ्यांना फटका बसला होता. पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले होते. शासन निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल पाठविला होता. त्यानुसार निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी लवकरच वर्ग केला जाणार आहे. दरम्यान, त्यानंतर झालेल्या नुकसानभरपाईचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला असून  निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.

मदतीचा निधी वळता करु नयेबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानप्रमाणात रक्कम जमा केली जाते. काही बँका ही रक्कम कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करण्याची शक्यता असते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळत नाही.  नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खाते व अन्य वसुलीसाठी वळता करु नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी बँकांना दिल्या आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार