शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

By admin | Published: March 23, 2017 2:24 AM

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ४४ कोटींचा निधी वितरित, १९.३६ कोटींचा खर्च.

संतोष वानखडे वाशिम, दि. २२- जिल्हयातील ४९१ ग्राम पंचायतींना २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून ४४ कोटी रुपयांचा निधी मिळालेला असतानाही, जानेवारी २0१७ पर्यंंत केवळ १९.३६ कोटींचा खर्च करण्यात आला. २४.६४ कोटी रुपये अखर्चित असून, ही टक्केवारी ५६ च्या घरात जाते. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सन २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींना एकूण ४४ कोटी सात हजार रुपयांचा निधी वितरित केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जमा-खर्चाचा आढावा घेतला असता तब्बल २४ कोटी ६४ लाख ३ हजार ३६१ रुपये अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले.एकिकडे अनेक गावांत मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत तर दुसरीकडे १४ व्या वित्त आयोगांतर्गतचा निधीही त्या-त्या गावात मोठय़ा प्रमाणात अखर्चित राहत असल्याने, ग्रामपंचायतींकडून गावकर्‍यांची दिशाभूल होण्याची भीती वर्तविली जात आहे.स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी दरवर्षाला भरघोष निधी मिळणार असल्याने गावात मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या गावकर्‍यांच्या पदरी यामुळे निराशा पडली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहत असतानाही, शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे ह्यरडगाणेह्ण ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी व सचिवांकडून गायिले जाते. पदाधिकारी व ग्रामसचिवांच्या ह्यरडगाण्याह्णचे पितळ अखर्चित निधीच्या आकडेवारीने उघडे पाडले आहे. प्राप्त व अखर्चित निधीचा लेखाजोखा तालुकाप्राप्त निधी(लाख)           अखर्चित निधी (लाख)वाशिम             ८१.३५                      १0.१४मालेगाव           ७७.५७                      ६२.८८रिसोड                ७८.२८                     ५८.४२कारंजा              ६७.५२                      ४१.२८मानोरा              ६७.९५                      ३३.३९मंगरूळपीर        ६७.२९                      ४0.२७