शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

सर्वसामान्य लोकांना 'आधार' नोंदणीसाठी त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:38 IST

Mangrulpir News शहरात असलेले आधार नोंदणी केंद्र हे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात हलविण्यात आले आहे.

मंगरुळपीर :  ० ते ५ वर्षे बालकांच्या आधार नोंदणीसाठी पोस्ट व बँकेत सेवा उपलब्ध करून देऊन बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे, तर शहरातील आधार नोंदणी केंद्रसुद्धा ग्रामीण भागात बालकांच्या आधार नोंदणीसाठी हलविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँक तसेच व्यवहारासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी केंद्रावर लोक सकाळपासून रांगा लावतात; परंतु सध्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी पोस्ट ऑफिस व बँकेत व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र याठिकाणी अनेकदा तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नाही. तर शहरात असलेले आधार नोंदणी केंद्र हे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे केवळ अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी यांना आधार नोंदणीसाठी अडचण येत आहे. शहरातील आधार केंद्रावर नोंदणीसाठी येणारे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी हे केंद्र बंद असल्याने परत जात आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने शहरातील आधार नोंदणी केंद्र पूर्ववत सुरू करून नोंदणी केंद्राची संख्यासुद्धा वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरAdhar Cardआधार कार्ड