शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर प्रशासनाचा भर

By admin | Published: March 20, 2017 7:20 PM

रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. 

जिल्ह्यातील स्थिती: पाच तालुक्यातील २२० गावांसाठी १.८७ कोटींच्या योजना वाशिम: मागील वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर भर दिला जात आहे. एकट्या रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात गत पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला; परंतु जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि जल साठवणीचे तोकड्या स्त्रोतामुळे जिल्ह्यातील काही गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील अशाच २५० हून अधिक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील ४७ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील ३१ गावे, कारंजा तालुक्यातील ४६ गावे, वाशिम तालुक्यातील ४५ गावे, मालेगाव तालुक्यातील ५१ गावे, तसेच मानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यातील गावांसाठी १ कोटी ८७ लाख ४३ हजार रुपये खर्चाच्या उपाय योजना शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. रिसोड पंचायत समितीच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १८० हातपंपांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, विहिर अधिग्रहणाचे ४ प्रस्ताव, नवीन हातपंपांचे १४१ प्रस्ताव, तसेच टँकरचे १० प्रस्ताव सादर केले असून, त्यातील करंजी गरड या गावासाठी एक टँकर त्वरीत मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले