शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:18 AM

किमतीबाबत शेतकऱ्यांची होतेय फसगत : कृषी विभागाच्या निर्देशाला कोलदांडा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रासायनिक खते, कीटकनाशक व बियाण्यांच्या अधिकृत किमतीसंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये तसेच खत, बियाणे, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध साठा व किमतीची माहिती दर्शविणारा तक्ता लावणे बंधनकारक आहे. या नियमाची वाशिम जिल्ह्यात सर्वत्रच पायमल्ली होत असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणली आहे.आता पेरणीचा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तथापि, बहुतांश कृषी सेवा केंद्रांनी बियाणे, खते व कीटकनाशकांचा एकूण उपलब्ध साठा, अधिकृत किमती व अन्य माहितीदर्शक फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावले नाही, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम शहरातील काही कृषी सेवा केंद्रांना मंगळवार व बुधवारी भेट दिली असता, दर्शनी भागात कोणतेही फलक आढळून आले नाही. काही कृषी सेवा केंद्रांत माहितीदर्शक फलक असल्याचे दिसून आले; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे आढळून आले. खते व कीटकनाशकांच्या अधिकृत किमती किती आहेत, आवश्यक ते खत व कीटकनाशकाचा साठा किती आहे, याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी दर्शनी भागात दरपत्रक व माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. मानोरा शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांत जाऊन पाहणी केली असता, एकाही ठिकाणी अद्ययावत माहितीदर्शक फलक आढळून आला नाही. एका ठिकाणी फलक होता; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे दिसून आले. रिसोड शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी एका कृषी सेवा केंद्रात माहितीदर्शक फलक आढळले; परंतु तेथे जुनीच माहिती होती, तर उर्वरित चार कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक आढळून आले नाही. कारंजा शहरातील सहा कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यापैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर दर्शनी भागात किंवा दुकानाच्या आत माहितीदर्शक फलक आढळून आले नाही. वाशिम शहरातील चार कृषी सेवा केंद्रांना भेट दिली असता एका कृषी सेवा केंद्रात फलक आढळून आले तर तीन कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक नसल्याचे दिसून आले. कृषी सेवा केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक लावण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. दरपत्रक नसल्याने किमतीबाबत शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता बळावली आहे. खत व कीटकनाशकाच्या किमतीवर काही सूट असल्यास त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची फसगत होते. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. खताचा काळाबाजार, जादा दराने विक्री, लिंकिंग पद्धत आदी शेतकऱ्यांना भंडावून सोडणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. कृषी सेवा केंद्राला भेट देताना, त्या केंद्राच्या दर्शनी भागात माहितीदर्शक फलक आहे की नाही, याची पाहणी केली जाते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. भरारी पथकाने अशी पाहणी केली तर सर्व केंद्रांमध्ये माहितीदर्शक झळकू शकेल, यात शंका नाही.कृषी सेवा केंद्रांनी दर्शनी भागात माहितीदर्शक फलक लावावे, अशा सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. याउपरही कुणी या सूचनांची अंमलबजावणी करीत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. नियमाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.- नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.