शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

अकोट न.प.वर रणरागिणी धडकल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:11 AM

वृक्ष संरक्षणाकरिता महिला एकवटल्याची पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणाऱ्या समाजकंटकावर वन कायद्यानुसार कारवाई करा, ही प्रमुख मागणी करीत घरातील कामे सोडून येथील रणरागिणी १७ जुलै रोजी स्थानिक नगर परिषद कार्यालयावर धडकल्या. वडाला धागे बांधून वटपौर्णिमेला वडाची पूजा करीत न बसता येथील महिला हिरवेगार वृक्ष वाचविण्याकरिता एकत्र आल्या. दारूबंदीच्या मागणीसाठी लढा उभारण्याकरिता महिला एकवटल्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत; परंतु वृक्ष वाचविण्याकरिता महिला एकवटल्याची ही घटना बहुधा पहिलीच असावी.अकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एसडीओंचे निवासस्थान आहे. या परिसरातील ८ हिरव्यागार वृक्षांची अवैधपणे कटाई करण्यात आली. सार्वजनिक विभागाने तीन वाळलेल्या वृक्षांचा लिलाव केला; परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापण्यात आली आहेत; तसेच नरसिंग रोडवरील नझुलच्या जागेवरील हिरवेगार झाड तोडले असताना आम्ही पोहोचल्याने कटाई करणारा पळून गेला आहे. या अवैधपणे वृक्ष कटाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीच्या अध्यक्ष शोभा बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पितांबरवाले, शोभना भांडे, रूचा ठाकूर, कविता राठोर, दीपाली केवटी, राधिका देशपांडे, मीनाक्षी आडे, मंजूषा बोडखे यांच्यासह अन्य महिलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीच्या सचिव गीता ठाकरे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले. यावेळी महिलांनी, आम्ही झाडे लावतो, शासनसुद्धा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे; परंतु खुलेआम वृक्ष कटाईमुळे शासनाची बदनामी होत असून, योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ‘त्या’ दोघींनी वाचविले झाडाला!अकोट येथील एसडीओंच्या बंगल्यातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरिता जनजागृती व धडपड सुरू झाली आहे. नरसिंग रोडवर नझुलच्या जागेतील एका हिरव्या झाडाची कटाई सुरू असल्याची माहिती वृक्ष लागवड समितीच्या सरचिटणीस चंचल पितांबरवाले व अर्पणा चिखले यांना मिळताच त्या तेथे धावून गेल्या. झाड तोडणाऱ्यास परवानगीपत्राची मागणी करताच त्याने पोबारा केला. त्यामुळे सदर झाड सध्या तरी वाचले. या दोघी जणी गेल्या नसत्या तर ते झाड कापले गेले असते. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांनी झाड वाचविल्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला; परंतु सध्या विविध कारणे देत वृक्ष तोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. संबंधित अधिकारी त्वरित कारवाई करीत नसल्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशन करीत वृक्षारोपण करायचे तरी कशाकरिता, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या स्थितीत सर्व नागरिकांनी वृक्ष लागवडीप्रमाणेच वृक्ष वाचविण्याकरिता सर्वांनी एकजूट होण्याची गरज निर्माण झाली आहे.