शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !

By admin | Published: July 17, 2017 2:32 AM

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २५ मे २०१७ रोजीच्या निर्णयानुसार २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे या पदासाठी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या पदासाठी पात्र असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन सादर करून ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, की राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी जारी केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट, सेट, पीएचडी आदि शैक्षणिक अर्हता प्राप्त क रीत आहेत; परंतु त्या प्रमाणात युजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या धोरणामुळे उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. युजीसी किंवा विद्यापीठाने वेळोवेळी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सूचित करुनही संबंधित संस्थाचालक त्यांच्या सुचनांचे पालन न करता रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र शासनही वेळोवेळी प्राध्यापक पदांच्या भरतीसह इतर महत्त्वाच्या पदांच्या भरतीत कपात करून वेळोवेळी पदभरती कमी करीत आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्याकडून हे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आमच्यावर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. प्राध्यापक पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी अल्पभूधारक, भूमीहीन या वर्गातील असून, उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक प्राध्यापकाची भरती तात्काळ सुरू करावी, असे न केल्यास या पदांसाठी पात्र असलेल्या अनेक उमेदवारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, यात शंका नाही.