शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आचारसंहितेच्या तोंडावर विकासकामांचे भूमीपुजन जोरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:41 IST

आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याचे संकेत असताना तीनही आमदारांनी विकासाचा आव आणत विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटाच लावल्याचे दिसून येत आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आमदारांना मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यानुसार, जिल्ह्यातील तीनही विद्यमान आमदारांना पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येकी १० कोटी याप्रमाणे ३० कोटींचा निधी मिळाला. दरम्यान, चालूवर्षीचा निधी खर्च करण्याबाबत उदासिनता बाळगण्यात आली आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याचे संकेत असताना तीनही आमदारांनी विकासाचा आव आणत विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटाच लावल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला २१ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. असे असताना या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे, उच्च शिक्षणाची सोय, दुर्धर आजारांवर उपचार, मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प यासह इतरही अनेक सुविधांची वाणवा कायम आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढण्यासोबतच १० वी, १२ वी नंतर विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाकरिता परजिल्ह्यात जावे लागते. आरोग्यविषयक सुविधांअभावी कर्करोगासह अन्य दुर्धर आजारांसाठी रुग्णांना अकोला, नागपूर, औरंगाबाद, मुंबई अशा मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने कोरडवाहू शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना भागवावे लागते. दरम्यान, या सर्व समस्यांकडे लक्ष पुरवून त्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील एकाही आमदाराने ठोस तथा यशस्वी प्रयत्न केलेले नाहीत.विद्यमान स्थितीत वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे आमदार लखन मलिक करित आहेत. कारंजा-मंगरूळपीरमध्ये भाजपाचेच राजेंद्र पाटणी; तर रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे आमदार अमीत झनक करित आहेत. यातील लखन मलिक यांची आमदारकीची तीसरी, पाटणी यांची तीसरी; तर झनक यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे; मात्र आमदारांच्या पाठीशी मोठा अनुभव असताना एकाही मतदारसंघाचा अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने सद्य:स्थितीत तीनही विद्यमान आमदारांनी विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे त्याची व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मिडियाच्या साधनांसह अन्यप्रकारे जाहिरातबाजी करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची सर्वत्र खमंग चर्चा होत आहे.

भूमीपुजन झाले; पण पावसाळ्यात कसे होणार बंधारे?वाशिम मतदारसंघातील पूस नदीवर १९ एफआरपी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला; मात्र आतापर्यंत ही कामे सुरू झाली नाहीत. आता दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आणि ७ ते ८ दिवसांवर त्याची आचारसंहिता लागण्याचे संकेत असताना ११ सप्टेंबर रोजी आमदार लखन मलिक यांच्या हस्ते भूमीपुजन झाले; परंतु सद्या सुरू असलेल्या पावसाळ्यात नदीवर सिमेंट बंधारे कसे उभारणार, असा प्रश्न सुज्ञ मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिम