शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:38 AM

कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने ...

कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याचे संकेत आहेत.

............................

शासकीय रक्तपेढीत सात दिवसांचाच साठा

शासकीय रक्तपेढीत महिन्याला किमान २५२ बॅग रक्ताचा साठा ठेवला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण झपाट्याने खालावले असून आजमितीस केवळ १५२ बॅग रक्त उपलब्ध आहे. रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास हा साठा सात दिवसांपेक्षा अधिक काळ पुरणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

...................

रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय

वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी कार्यान्वित आहे. जिल्हाभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तसेच इच्छुकांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत येऊन रक्तदान केले जाते. यामुळे रक्ताची उणीव भासत नसे; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.

.................

डाळे रक्तपेढी, वाशिम

वाशिम शहरातील डाळे रक्तपेढीचे संचालक डाॅ. नारायण डाळे यांच्याशी चर्चा केली असता, रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, गावोगावी शिबिरे घेऊन रक्ताचा साठा वाढविण्याकरिता प्रयत्न व्हायला हवे; अन्यथा परिस्थती गंभीर होईल, असे त्यांनी सांगितले.

.................

लसीकरणाआधी करा रक्तदान

कोरोना लस घेतल्यानंतर २८ दिवस आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पुन्हा २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांनी कोरोना लस घेण्याआधीच रक्तदान करावे. यामुळे अपघात, प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू टाळता येणे शक्य होईल, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.