शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षणतज्ञांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:21 IST

मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.

ठळक मुद्देग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.शिक्षणाशिवाय गरीबी दूर होणार नाही म्हणून पालक, शिक्षकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे, शाळेची उपस्थिती वाढवुन शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच शासनाच्या विविध योजना आदिवासी, अनुसुचीत जाती च्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे,त्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी तत्पर असावे, अनेक गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक आठ ते पंधरा दिवस येत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितल्यावरुन त्यांनी चिंता व्यक्त केली. येथील जिल्हा परिषदच्या शाळांनाही त्यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चवथ्या वर्गातील मुलांना जोडाक्षरे, बेरीज, वजाबाकी आली पाहिजे असे त्यांनी शिक्षकांना सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, घरकुल, शौचालये आदि कामाच्या दर्जा व सुधारणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त करुन प्रशासनाबाबत चिड व्यक्त केली. महाराष्ट्र बदलतो आहे असे म्हटल्या जाते, मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील गाव,तांड्यावर विकासाच्या बाबतीत बºयाच सुधारणा होणे बाकी आहे. बंजारा समाजातील बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि मागासलेपणा त्यांच्या गरीबीस कारणीभूत आहे. उसतोड कामगारांचा प्रश्न असो वा शेतात राबवणाºया मजूरांच्या मजुरीचा प्रश्न कायम आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी काही प्रकल्प राबविले पाहिजे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही असावे असेही त्यांनी म्हटले. राज्यातील १०० गावांना भेटी देवुन गरीबी बाबत आपण अहवाल लिहून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार असेही त्यांनी सांगितले. त्यांचे सोबत वाशिम येथील विठ्ठल जोशी, सत्यजीत कांबळे, कोल्हे व मानोरा येथील माणिक डेरे, संजय अलदर होते. माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या निवासस्थानी वाईगौळ येथे जावुन त्यांनी त्यांचेसोबत चर्चा केली.