शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धनगर आरक्षणासाठी समाजाची एकजूट महत्वाची -  डॉ. विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:51 IST

वाशिम : येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील मराठा समाजाने एकजूट दाखवून आरक्षणाच्या मुद्यावर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले, आंदोलने केली. त्याचे फलीत म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने आरक्षण बहाल केले. सवर्णांनाही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्याच धर्तीवर येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात केले.धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी वाशिम येथे काटा-कोंडाळा रोडवरील खुल्या प्रांगणात सुमारे १५ हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात आक्रोश महामेळावा पार पडला. या कार्यक्रमास अनंतकुमार पाटील, युवा नेते गोपीचंद पडळकर, आमदार रामराव वडकुते, उत्तमराव जानकर, डॉ. शशिकांत तरंगे, भैयासाहेब बंडगर, शिवदास बिडगर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. महात्मे म्हणाले, की राज्यशासनाने गेल्या साडेचार वर्षांत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. आता केवळ ४० दिवसांचा अवधी उरला आहे. त्यात आरक्षणाच्या जल्लोषाचा पिवळा रंग उडवायची संधी नाही मिळाली तर निवडणूकीनंतरचा लाल गुलालही राज्यकर्त्यांना उधळू देणार नाही, असे ते म्हणाले. धनगर समाज भीक मागत नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात दिले आहे, तोच आरक्षणाचा हक्क मागत आहोत. त्यामुळे यापुढे हयगय झाल्यास धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलनाची धार अधिक तीव्र करेन. त्यासाठी समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या खास शैलीत शासनाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाला ७० वर्षांपासून आरक्षणासाठी झुलत ठेवले, त्याचप्रमाणे भाजपानेही भुमिका अंगिकारली तर समाज आता गप बसणार नाही. आरक्षण नाही मिळाले तर राज्यातील धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीने भाजपाला मत देवू नये. भाजपाच्या कुठल्याच सभेला हजेरी लावू नये, असे आवाहन पडळकर यांनी केले. जो राजकीय पक्ष धनगर समाजाला आमदार, खासदारकीची संधी देईन, त्याच्याच पाठीशी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत समाज उभा राहीन, असेही पडळकर यांनी यावेळी सांगतले. उपस्थित इतर मान्यवरांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. आरक्षण आक्रोश महामेळाव्यास राज्यभरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी वाशिमचे नगरसेवक बाळू मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव मस्के, सरपंच बबनराव मिटकरी, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, विनोद मेरकर, डिगांबर खोरणे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नप्ते यांच्यासह जिल्हाभरातील समाजबांधवांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमDhangar Reservationधनगर आरक्षणVikas Mahatmeविकास महात्मे