शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:15 PM

Washim News : हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   ग्रामीण भागातील जनतेला  सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकांना बिघाडाचे ग्रहण लागले आहे. दिवसाला ८ संगणक आणि प्रिंटर नादुरुस्त होत असल्याने ग्रामीण भागांतील शेतकरी, विद्यार्थ्यांसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले, नाहकरत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला आदी १३ प्रमाणपत्रासाठी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना अर्जदारांना लांब रांगेत उभे राहणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे मिळवू शकतात.  ही सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत; परंतु आता या सेवा केंद्रातील संगणक जुने झाल्याने त्यात वारंवार बिघाड होत असून, दिवसाला ८ संगणक नादुरुस्त होत असल्याची माहिती या यंत्रणनेशी निगडीत घटकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. 

५० संगणक संच निकामीचजिल्ह्यातील ४९१ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी दरदिवशी ८ केंद्रांतील संगणकात बिघाड होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे कठीण होत आहे. त्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील ५० संगणक संच निकामीच झाल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली असून, हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे. 

१० वर्षांपासून नवी खरेदीच नाहीआपले सरकार सेवा केंद्र योजना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतीत या योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांसाठी २०११ मध्ये संगणक संचांची खरेदी करण्यात आली. आता दहा वर्षे उलटत आले असून, याच संगणक संचांच्याआधारे आपले सरकार सेवा केंद्रांचे काम सुरू असून, नवे संच खरेदीच करण्यात आलेले नाहीत. 

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे संगणक १० वर्षे जुने असून, त्यात आता वारंवार बिघाड होत असल्याने जनतेला सुरळीत सेवा देण्यात अडचणीत येत आहेत.- शेखर हिरगुडेआपले सरकार सेवा केंद्रचालक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम