शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
2
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
3
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
4
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
5
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
6
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
7
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
9
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
10
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
11
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
12
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
13
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
14
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
15
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

मालाचा दर्जा चांगला नसल्याचे घेतले जाते संमती पत्र!

By admin | Published: March 21, 2017 3:03 AM

वाशिममधील प्रकार : मोजणीला विलंब, माल पाहण्यापूर्वीच दर्जाची निश्‍चिती

वाशिम, दि. २0-शासनाने तुरीला ५ हजार ५0 रुपयांचा हमीभाव जाहीर केला. नाफेडची खरेदी सुरू केली; परंतु या दोन्ही बाबींचा शेतकर्‍यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र वाशिम बाजार समितीत दिसत आहे. नाफेडच्या केंद्रावर शेतकर्‍यांना टोकन देऊन तब्बल दीड महिना माल मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कंटाळल्यानंतर बाजारात माल विकणार्‍या शेतकर्‍यांकडून त्यांचा शेतमाल एफएक्यू अर्थात उच्च गुणवत्तेचा नसल्याचे प्रमाणपत्रच बाजार समितीकडून घेण्याचाही प्रताप करण्यात येत असल्याचे ह्यलोकमतह्णकडून २0 मार्च रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला. यंदा शासनाने सोयाबीनला २ हजार ८00 रुपये, तर तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला; परंतु या दोन्ही मालास हमीभाव देण्याला व्यापार्‍यांनी खो दिला आहे. मालाची प्रतवारीही चांगली आहे; परंतु शेतकर्‍याच्या मालाचे भाव पाडण्याचे कुटील षड्यंत्र बाजार व्यवस्थेकडून राबविले जात आहे. शासनाने नाफेडची खरेदी सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच वखार महामंडळाची गोदामे भरल्याने नाफेडने खरेदी संथ केली. जिल्ह्यात पाच तालुक्यांत होत असलेली नाफेडची खरेदी काही ठिकाणी महिनाभरातच साठवणुकीच्या अडचणीपोटी बंद करण्यात आली. शेतकरी आक्र मक झाल्यानंतर नाफेडने खरेदी सुरू केली; परंतु आता या ठिकाणी शेतकर्‍यांचा माल मोजण्यास तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी लागत आहे. वाशिम येथे दोन वजन काटे सुरू असतानाही दिवसाला शंभर, दीडशे क्विंटल तुरीची मोजणी होत आहे. महिनाभर थांबण्याची शक्तीच शेतकर्‍यांत नसल्याने शेतकरी बाजारात व्यापार्‍यांकडे माल विकण्यावर भर देत आहेत; परंतु या ठिकाणी हमीभावाची अडचण नको म्हणून बाजार समिती चक्क प्रत्येक शेतकर्‍याकडून त्याचा माल एफएक्यू (सरासरी चांगल्या दर्जाचा) नसल्याच्या संमती पत्रावर स्वाक्षरी घेत आहे.शेतकर्‍यांकडून छुपी अडत वसुलीनाफेड आणि व्यापारी शेतकर्‍यांची लुबाडणूक करीत असतानाच अडत्याकडूनही शेतकर्‍यांना लुबाडण्याचा प्रकार वाशिम येथे सुरू असल्याचे सोमवारी उघडकीस आले. शेतकर्‍यांकडून अडत वसुली बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही काही शेतकर्‍यांकडून एका अडत्याने अडतीचे (बटाऊ) पैसे वसूल केल्याच्या तक्रारी बाजार समितीकडेच काही शेतकर्‍यांनी केल्या आहेत. अडत्याकडून शेतकर्‍याला देण्यात येणार्‍या पावतीवर नियमानुसार खर्चाची दर आकारणी करून पावतीच्या मागील बाजूस एक रु पया शेकडाप्रमाणे अडतीचे पैसे कापल्याचा हिशेब करून शेतकर्‍यांना पैसे चुकविण्यात आले आहेत.