शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वादळवारा, अवकाळी पावसामुळे ५१० एकरातील पिकांचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:38 IST

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली.

वाशिम :  एकामागून एक कोसळणाऱ्या संकटापुढे शेतकरी पुरता गारद झाला असून, गत दोन दिवसांतील अवकाळी पाऊस, गारपिट व वादळवाऱ्यामुळे ५१० एकरातील ( २०४ हेक्टर) पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली. वादळवाऱ्याचा जोर प्रचंड असल्याने पपई, संत्रा यांसह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहोरही गळून पडला. हवामान खात्याने ५ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. या संकेतानुसार सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागात वादळवाऱ्यासह गारपिट, तुरळक पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण, वादळवारा आणि तुरळक पाऊस झाल्याने गारठा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळवाऱ्यामुळे संत्रा, पपई, लिंबू, आंब्याचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आर्थिक संकटच कोसळले. हातातोंडाशी आलेला घास वादळवारा, गारपिट व अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

वादळवारा, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एका गोऱ्हाचा मृत्यू झाला. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Rainपाऊस