शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

नुकसानग्रस्त ६८ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

By सुनील काकडे | Published: May 13, 2023 5:56 PM

पिकांची अतोनात हानी : नैसर्गिक संकटांपुढे बळीराजा हतबल

वाशिम : एरव्ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कडक ऊन्ह तापते. यंदा मात्र वातावरणात बदल होऊन एप्रिलच्या अखेरपर्यंत अधूनमधून ढगाळी वातावरण निर्माण होण्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान गारपीट होऊन पिकांची अतोनात हानी झाली. त्यापूर्वीही निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने वर्षभरात २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांना मदत मिळाली; तर ६८ हजार ३३ शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात गहू, मूग, तूर, उडिद, कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी विविध फळांच्या बागा विकसीत केल्या; तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी पुरते हतबल होत आहेत. यंदा तर भर उन्हाळ्यात ढगाळी वातावरण कायम राहण्यासह जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याने प्रामुख्याने फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिकाचेही यामुळे नुकसान झाले. त्यापूर्वीही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. मात्र, मदत मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.१ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना मिळाली मदतजुलै २०२२ ते ८ मे २०२३ या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ९३ हजार ६२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शवून नुकसान भरपाईपोटी २६५ कोटी ४५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १९७ कोटी २३ लाख रुपये वर्ग करण्यात आले; मात्र ६८ हजार ३३ शेतकरी मदतीपासून अद्याप वंचित असून ६८ कोटी २२ लाखांचा निधी संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होणे आवश्यक आहे.

जुलै २०२२ पासून ८ मे २०२३ पर्यंत विविध स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतनिधी जमा करण्यात आला असून उर्वरित ६८ हजार ३३ शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी