शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कर्जमाफी निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:57 AM

पात्र शेतकरी संभ्रमात : बँका गुंतल्या याद्या तयार करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अस्मानी, सुलतानी संकटांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळण्याकरिता थेट राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन छेडले. त्याचा सकारात्मक फायदा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली; मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दुसरीकडे पीक कर्ज वाटप करणाऱ्या सर्वच बँका गेल्या अनेक दिवसांपासून केवळ याद्या तयार करण्यातच गुंतल्याने कर्जमाफी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१२ नंतरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार, बँकांकडून याद्या मागविण्यात आल्या; मात्र त्यावर शेतकरी संघटना तथा विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर तीन वर्षे मागे जात २००९ पासून पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा बँकांकडून सुधारित याद्या मागविण्यात येत आहेत. तथापि, दैनंदिन बँकिंग व्यवहार सांभाळून कर्जमाफीस पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या गोळा करण्यातच बँकांचा अधिक वेळ जात असून, कर्जमाफी मिळण्यास विलंब होत असल्याने नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे. कर्जमाफीच्या या गदारोळात १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वेगळे वक्तव्य करून ज्यांचे उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे जाहीर करून ज्यांची उपजीविका निव्वळ शेतीवरच अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळेल, असा फतवा जाहीर केल्याने कर्जमाफीच्या निर्णयातील घोळ कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.