शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या वेळी एकनिष्ठ राहिले, उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? मातोश्री गाठली
2
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
3
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
4
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
5
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
6
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
7
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
8
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
9
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
10
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
11
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
12
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
13
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा
14
हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
15
Karan Johar Dharma Production : करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
16
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
17
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
19
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
20
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला

जिल्हा पात्र असूनही ‘अग्रीम’मधून डावलला; शेतकऱ्यांवर अन्याय

By सुनील काकडे | Published: November 04, 2023 7:15 PM

विमा कंपनीकडून सावत्रपणाची वागणूक

वाशिम : पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णयानुसार, यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी २५ टक्के आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळण्यासाठी पात्र ठरले होते. तसा सर्वंकष आणि प्रभावी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी तयार करून मंजूरीसाठी पाठविला होता; मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांना झुकते माप देवून पीक विमा कंपनीने वाशिमला त्यातून सपशेल डावलल्याची माहिती ४ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली.

जिल्ह्यात खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यात पावसातील खंडामुळे पिकांच्या अपेक्षित उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व ४६ महसूल मंडळांमध्ये पीक नुकसानीची अधिसूचना निर्गमित केली. तथापि, पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे अपेक्षित उत्पादनात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असेल तर विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असताना आणि कृषी विभागाने तसा सविस्तर अहवाल सादर करूनही विमा कंपनीने मात्र जिल्ह्याला २५ टक्के ‘अग्रीम’मधून डावलले आहे. हा शेतकऱ्यांवर एकप्रकारे मोठा अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटत आहे.चालूवर्षीच्या खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर पोहोचली होती. त्यानुसार, कृषी विभागाने जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांमध्ये सर्वेक्षण करून सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असल्याचा अहवाल सादर केला. नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळणे अपेक्षित होते; मात्र विमा कंपनीने त्यातून एकमेव वाशिम जिल्ह्यालाच का डावलले, हे कळू शकले नाही.- आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम