शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 5:11 PM

मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

वाशिम : अमरावती विभागात आॅक्टोबर-नोव्हेंबर-२०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम शासनाने विविध टप्प्यात जिल्हास्तरावर मार्चपूर्वी वितरीत केली. बँक खात्यातील चुका व अन्य कारणामुळे अजूनही ८ टक्के शेतकरी यापासून वंचित राहिले. वंचित शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत संबंधित तलाठ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे देऊन नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल. या मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जोरदार अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नुकसानापोटी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने निधी मिळाला. आतापर्यंत ९२ टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत ८ टक्के शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्याने तसेच अचूक बँक क्रमांक, आधार क्रमांक न दिल्याने ही रक्कम शेतकºयांपर्यंत पोहचू शकली नाही. वंचित शेतकºयांना नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, १५ जूनपर्यंत या शेतकºयांना आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची छायांकीत प्रत संबंधित तलाठ्यांकडे जमा करावी लागणार आहे. त्याऊपरही कुणी तलाठ्याशी संपर्क साधला नाही तर शिल्लक राहिलेली रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र