शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची वीज कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 7:10 PM

वाशिम : जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी मंगळवारी दिली.जिल्ह्यातील ४९१ पैकी ४४३ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरविली जाते. त्यातील २५८ ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विद्यूत देयक अदा केलेले नाही. साधारणत: वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेली विद्यूत देयकांची ही रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे मार्च २०१७ या महिन्यापासूनच संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यामुळे २५८ पैकी साधारणत: १५० ग्रामपंचायतींनी थकबाकी अदा करून विज पुरवठा सुरळित करून घेतला. मात्र, शंभरावर ग्रामपंचायतींनी अद्याप विद्यूत देयक अदा केलेले नाही. १७ जुलैअखेरच्या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये वाशिम तालुक्यातील २२, मालेगाव तालुक्यातील १९, रिसोड तालुक्यातील १८, मंगरूळपीर तालुक्यातील १४, मानोरा तालुक्यातील १२; तर कारंजा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली असून ती वसूल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी किमान चालू महिन्याचे देयक आणि व जुन्या थकबाकीपैकी किमान ३0 ते ४0 टक्के रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करायला हवे. - विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.