शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

By admin | Published: March 17, 2017 3:29 AM

संत्रा, आंबा पिकांचे नुकसान ; सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात सर्वदूर गुरुवार, १६ मार्च रोजी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलूबाजार परिसरातील काही गावांना गारपिटीने झोडपले. प्रशांत प्रल्हाद हिरपूरकर (रा. वनोजा, ता. मंगरूळपीर) यांच्यासह इतर शेतकर्‍यांच्या संत्र्याचे वादळी वार्‍यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात, गारांसह झालेल्या या पावसामुळे प्रामुख्याने आंबा आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्र्याचे नुकसानमंगरुळपीर तालुक्यात १६ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी, वादळी पावसाने गहू, हरभरा यासह संत्रा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यात यावर्षी पाण्याचा साठा लक्षात घेऊन अनेक शेतकर्‍यांनी हरभरा गहू, भाजीपाला, कांद्याची लागवड केली होती; मात्र १६ मार्चला झालेल्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले होते; परंतु लवकरच पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. तांदळी येथे उभा गहू जमीनदोस्त, कांदा बीजाचेही नुकसानवाशिम आणि अकोल्याच्या सीमेवरील तथा वाशिम जिल्हय़ाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तांदळी या गावात आज दुपारी वादळी वार्‍यासह, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यासह कांदा बीजाचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.