शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित!

By admin | Published: March 30, 2017 2:44 AM

२0१२ पासून मिळाली नाही रक्कम; शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

वाशिम, दि. २९- शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून विविध स्वरूपात शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यात यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. मात्र, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सुमारे चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले असताना त्यांना कुठल्याच प्रकारचे अर्थसहाय्य शासन स्तरावरून झालेले नाही.पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जायची. त्यात गतवर्षीपासून बदल होत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी ही परीक्षा घेतली जाते. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता इयत्ता आठवीमध्ये एनएमएमएस नावाची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) ही देखील शिष्यवृत्तीचीच परीक्षा असून, ती दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांंकरिता आयोजित केली जाते. तथापि, सन २0१२ पासून या तीनही प्रकारच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. संबंधित विद्यार्थ्यांंना शासनाच्या ध्येय-धोरणानुसार देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना शासन स्तरावरून एकाही विद्यार्थ्यास गेल्या पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या या परीक्षा केवळ तकलादू ठरत असून, विद्यार्थी, पालकांसोबतच शाळांच्या मुख्याध्यापकांचीदेखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे.