शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

सरकार शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार!

By संतोष वानखडे | Updated: May 19, 2024 17:38 IST

शाळा बचाव समितीची बैठक : ग्रामसभांचे ठराव घेणार

वाशिम : पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करणे, समूळ शाळेच्या माध्यमातून समायोजन करणे आदी प्रकाराला विरोध करीत सर्व सरकारी शाळा वाचविण्यासाठी जिल्ह्यात लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार रविवारी (दि.१९) वाशिम येथे पार पडलेल्या शाळा बचाव समितीच्या बैठकीत करण्यात आला. स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे पार पडलेल्या बैठकीला शिक्षण बचाव समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निमंत्रक रमेश बीजेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  

यावेळी डॉ. रवी जाधव, गजानन धामणे, प्रल्हाद पौळकर, रामचंद्र वाढे, भागवत मोहिरे, प्रशांत देशमुख, महेंद्र खडसे, रामदास आरू, अजय सोनुनकर, जगदेव राऊत, राहुल भगत, प्रमोदकुमार राऊत, राम शृंगारे, मधुकर महाले, निलेश राठोड, सुगत तायडे, ज्ञानेश्वर गवळी, नागेश काळे, रितेश राऊत, दत्तात्रय राजगुरू आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारने २०२० ला लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी देश पातळीवर केली जात आहे. राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी करताना समूह शाळेच्या माध्यमातून समायोजनेच्या नावाखाली कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांना कायमचे टाळे ठोकले जात असल्याचा आरोप यावेळी रमेश बिजेकर यांच्यासह मान्यवरांनी केला. शाळा बचाव समितीच्या माध्यमातून शाळा बंद होणाऱ्या गावांमध्ये प्रबोधन करून बंद होणाऱ्या शाळांना वाचविण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत. ते ठराव शासनाला पाठविले जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश भुताडे यांनी तर प्रास्ताविक गजानन धामणे यांनी केले. गावोगावी प्रबोधन करणारवाशिम जिल्ह्यातील कमी पटसंख्या असणाऱ्या १५० पेक्षा अधिक सरकारी शाळांना वाचविण्यासाठी शाळा बचाव समितीकडून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. संबंधित गावांना भेटी देऊन त्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तसेच शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शाळा बचाव समितीचे प्रभावी संघटन बांधण्यासाठी अध्यक्ष मंडळ, सचिव मंडळ, कार्यकारी मंडळ या माध्यमातून पदनिर्मिती करून शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळीला बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा