शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

कारंजासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ!

By admin | Published: July 15, 2017 1:54 AM

नागरिक भयभीत : दोन महिन्यात सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शैक्षणिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या कारंजा शहर गत दोन महिन्यांपासून चोरट्यांचा दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येते. गत दोन महिन्यांत सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही.कारंजा शहरात शहरासाठी व ग्रामीण भागासाठी, असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन आहेत. शहरातील अवैध धंदे व चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे. शहरासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या जून ते जुलै महिन्यात जवळपास पाच ठिकाणी दिवसासह रात्री चोरट्यांनी मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. याशिवाय भुरट्या चोऱ्याही सुरू असल्याने नागरिक भयभीत आहेत. कारंजा शहर पोलीस स्टेशनला ८१ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तर ८० पोलीस कर्मचारी आहेत. यामध्ये चार महिला व पाच चालकांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनला ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एक पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या जून महिन्यापासून, तर आतापर्यंत चोऱ्या मोठ्याा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. दिवसाही चोऱ्या होत आहे. पोलिसांचा वचक नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे बोलले जाते. कारंजा भाजीबाजार येथील एक दुकान फोडून दुकानातील रोख ५४ हजार ३०० रुपयांचा माल चोरी गेल्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली होती. काही दिवसांतच शिक्षक कॉलनीतील बलदेव रंगराव चव्हाण यांच्या घरातून १ लाख ६० हजार रुपयाचा माल लंपास केला. २९ जून रोजी ज्ञानेश्वर जयसिंग गळकर रा. कारंजा यांच्या घरी दिवसा चोरी होऊन ६० हजार रुपयांचा माल चोरी गेला. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील ग्राम कामठवाडा येथे रात्रीच्या वेळी बकरी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी १ जुलैच्या पहाटे पकडले. ११ जुलै रोजी यशोदानगरातील प्रा. प्रेमनाथ दाभाडे हे घर मालक बाहेरगावी, तर महिला टायपिंगला गेली असल्याचे पाहून घराच्या मुख्य दाराचे कुलूप फोडून घरामधील १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तसेच कारंजा शहरातील लाहोटी प्लॉटमध्ये रहिवासी असलेले समीर खा अमीर खा हे ८ ते १३ जुलैदरम्यान गावाला गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप फोडून घरामधील दोन सोन्याच्या अंगठ्या व दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्यासह ठाणेदारांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.चोरींची प्रमाण वाढले, हे निश्चित आहे. मागील काळात झालेल्या चोऱ्यांचा अभ्यास करून या चोऱ्यांचा तपास पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठी नागरिकांनी अनोळखी इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्यास पोलिसांना कळवावे. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांनी पोलिसांना माहिती द्यावी. डॉ. रत्नाकर नवलेउपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा