शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

ग्रामीण भागांतील संसर्ग वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:38 AM

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत लोकसंख्या कमी असते, तसेच बाजारपेठा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग ...

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत लोकसंख्या कमी असते, तसेच बाजारपेठा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीस फारसा वाव मिळणे कठीण असते; परंतु ग्रामीण भागांतील जनतेचा शहरात विविध कामांसाठी होणारा प्रवास, तसेच नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागांत कोरोना संसर्ग आटोक्याबाहेर गेला आहे. त्यात मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यासह वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. आठवडाभरात जिल्ह्यात २७०५ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने कठोर उपाय योजना सुरू केल्या आहेत.

-----------------

जिल्हा सीमेलगतच्या गावांची स्थिती गंभीर

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. प्रामुुख्याने ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचा उद्रेकच सुरू असून, जिल्हा सीमेवर असलेली गावे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह काही गावांत कन्टेनमेंट झोनची संख्या लक्षणीय आहे, तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार या गावच्या सर्व सीमाच पाच दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यातील कामरगाव, सोमठाणा, धनज बु, खेर्डा, उंबर्डा बाजार, बेंबळा, तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, वनोजा या जिल्हा सीमालगतच्या गावांत आठवडाभरात १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.