शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

Lockdown Efect : व्यापार ठप्प; ५०० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:58 AM

३२ दिवसांपासून व्यापारपेठ कडकडीत बंद असून सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २५ मार्चपासून आजतागायत संचारबंदी आणि लॉकडाऊन कायम आहे. यामुळे गेल्या ३२ दिवसांपासून व्यापारपेठ कडकडीत बंद असून सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज (२६ एप्रिल) अक्षय तृतीयेचा सण असताना सराफा बाजार बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार, गर्दी टाळण्याकरिता २५ मार्चपासून जीवनावश्यक साहित्य विक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू ठेवण्यास सक्तीने मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांसह ग्रामीण भागातील व्यापार गत ३२ दिवसांपासून पूर्णत: ठप्प झाला आहे. त्यात प्रामुख्याने कपडा, संसारोपयोगी भांडी, कुलर, एसी, फ्रीज, वाहन, सोने-चांदी विक्रीवर संक्रांत ओढवली आहे. तथापि, ऐन लग्नसराईच्या हंगामात कोरोनाच्या संकटाने ओढवलेल्या या आरिष्टामुळे आतापर्यंत सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. ही स्थिती यापुढेही ३ मे पर्यंत अर्थात आठवडाभर कायम राहणार असून नुकसानात आणखीनच भर पडणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच व्यापारी हैराण झाले आहेत. विशेषत: सर्वाधिक सोने-चांदी खरेदी होणाऱ्या अक्षय तृतीया या सणाला सराफा बाजार बंद राहिल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला.

लग्नसोहळे रद्द; कोट्यवधींचा कपडा दुकानातच पडूनकोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू असून पाचपेक्षा अधिक लोक एकाच ठिकाणी एकत्र न येण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण एप्रिल महिन्यातील नियोजित लग्नसोहळे रद्द झाले आहेत. त्याचा थेट परिणाम कपडा मार्केटवर झाला आहे. लग्नसोहळेच रद्द झाल्याने सट्टा खरेदीचा प्रश्नच राहिला नाही. यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक करून खरेदी केलेला कपडा दुकानांमध्ये तसाच पडून आहे. ३ मे रोजी ‘लॉकडाऊन’ संपुष्टात आल्यास काही प्रमाणात व्यापार होऊ शकतो.

एकाच दिवशी 10 कोटींचे नुकसानसाडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाºया अक्षय तृतीया सणाला सोने-चांदी खरेदी केली जाते. यंदा मात्र जिल्ह्यातील ४०० दुकाने लॉकडाऊनमुळे बंद राहिल्याने एकाच दिवशी सरासरी १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उकळकर यांनी वर्तविला.

मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये लग्नसराईची धूम असते. त्यामुळे जिल्ह्यातील कपडा, सराफा मार्केट ग्राहकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर गत ३२ दिवसांपासून संपूर्ण व्यापारपेठ बंद असल्याने सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले आहे.- जुगलकिशोर कोठारी, जिल्हाध्यक्ष, व्यापारी मंडळ, वाशिम

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली. एकमेव रुग्ण ठणठणीत झाल्याने सद्या जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे साहजिकच व्यापाºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले; मात्र सर्वांनीच अपेक्षित सहकार्य केल्याने यश मिळू शकले. शासनस्तरावरून निर्देश प्राप्त झाल्यास ३ मे नंतर परिस्थिती बºयापैकी पुर्वपदावर येईल.- हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय