शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:15 IST

विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते.आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले. पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मालेगाव : शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळून जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. असे असले तरी शहराच्या विकासाने आजही गती धरलेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची मागणी होत आहे. मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले असून काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कच्चे रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाºयांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेला आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी गांधी चौकातील रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सदर रस्ता अल्पावधीतच उखडून परिस्थिती पुर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाली आहे. नगर पंचायतीने ही बाब गांभीर्याने घेवून पावसाळा असेपर्यंत रस्त्यांची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव