शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस

By दादाराव गायकवाड | Updated: September 2, 2022 17:00 IST

जुलै, ऑगस्टमधील दमदार पावसाचा परिणाम

वाशिम: राज्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाली असून, हवामान विभागाच्या अहवालानुसार १ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी खूप अधिक राहिली. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले, शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले होते. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय तर ९५ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड (१६), यवतमाळ (१५), नागपूर (१४), नाशिक, अहमदनगर आणि चंद्रपूर (प्रत्येकी १३), पुणे (१२), गडचिरोली (११) आणि सांगली (१०) या नऊ जिल्ह्यातीलच ९१ तालुक्यांचा समावेश आहे.

११ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

एकीकडे ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असताना ११ तालुक्यात पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील बोधवाडा, सोलापुरातील सांगाेळा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी आणि पथारी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम