शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

गावतलावांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:12 IST

१०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत जवळपास ४५० जलसाठ्याचे प्रकल्प असून, यापैकी १०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही. मार्च २०२० मध्ये पाठविलेला २९.९९ कोटींचा निधी प्रस्तावही शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी कवठळ परिसरातील दोन गाव फुटल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेतर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.जि.प.जलसंधारण विभागांतर्गत गावतलाव, कोल्हापूरी बंधारे, लघु प्रकल्प आदी प्रकारातील जवळपास ४५० जलसाठे प्रकल्प आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे तलाव फुटून नुकसान होऊ नये म्हणून उन्हाळयातच आवश्यक त्या तलावांची देखभाल, दुरूस्ती होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची आयुर्मर्यादा साधारणत: ५० वर्षांची असते. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा निधी आवश्यक असून, तसा प्रस्तावही जि.प. प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शासनाकडे पाठविला. सध्या हा प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. जिल्ह्यात १० आॅगस्ट रोजी कवठळ परिसरातील दोन गावतलाव फुटल्याने संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी निधी प्रस्ताव निकाली निघणे आवश्यक आहे.

कवठळ परिसरात पंचनामे सुरूमंगरूळपीर : तालुक्यातील कवठळ येथे १० आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे दोन गावतलाव फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १२ सप्टेंबरपासून प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त शेतजमिनीच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही तलाव हे २८ वर्षे जुने असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पिकांचे नुकसान झाले तसेच जमीनीसुद्धा खरडून गेल्याने रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे यापूर्वीच सादर केला.- ए.एम. खानजिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प.

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर