शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By संतोष वानखडे | Published: January 15, 2024 7:07 PM

वाशिमात भूमि हक्क परिषद.

 वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. देशाचे संविधान कोणिही बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलत असल्याबाबत काँग्रेस व विरोधी पक्ष हे जनतेची व समाजाची दिशाभूल करीत असल्याचे टिकास्त्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १५ जानेवारी रोजी वाशिम येथील भूमि हक्क परिषदेत सोडले.

स्थानिक वाटाणे लॉन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने आयोजित आयोजित भूमि हक्क परिषदेचे उद्घाटक म्हणून ना. रामदास आठवले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे (आ.) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे होते. पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले, देशाचे संविधान अबाधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन चालत आहेत, सर्वांना न्याय देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कडूबाई खरात यांनी भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. परिषदेला मोठ्या संख्येने रिपाईचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले नागरीक उपस्थित होते. भूमिहीनांना जमिनी देण्याची मागणी रेटणार

भूमि हक्क परिषदेच्या मध्यमातुन आपन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेवुन कष्टकरी, भूमिहीन दलित समाजातील लोकांना जमिन देण्याची मागणी आपण रेटणार असल्याचे आश्वासन ना. आठवले यांनी दिले. प्रलंबित वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाबाबत निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच, वाशिम-जालना या लोहमार्गासाठी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिष्टमंडळज्ञसोबत लवकरच भेट घेऊ, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम