शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

By admin | Published: July 16, 2017 2:18 AM

कर्जमाफीतील गुंतागुंतही कायम : बँकांना अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाचा खरीप हंगाम शेतीसाठी सर्वार्थाने वेगळा राहिला असून, एरव्ही १ जुलैपर्यंंतच पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संपत असताना यंदा मात्र १५ जुलैपर्यंंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफीबाबतही बँकांना शासन स्तरावरून अद्याप स्पष्ट निर्देश नसल्याने अथवा यासंदर्भातील सकरुलर मिळाले नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात ९५0 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जुलै २0१६ पर्यंंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकर्‍यांना तब्बल ८९0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या हंगामाकरिता ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ जुलैपर्यंंत केवळ ३१0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊ शकले. कर्ज वाटपाचे प्रमाण घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नाही. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. अशातच आता राज्य शासनाने सन २00९ पासूनच्या कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी होऊन थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाल्यास ते नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात; परंतु यासंदर्भातील अधिकृत घोषणापत्र जिल्ह्यातील एकाही बँकेला अद्याप प्राप्त झालेले नाही. जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून केवळ कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना २00९ पासून थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसोबतच कर्जमाफीसंदर्भातील गुंतागुंतही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.