शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

प्रशासकीय मान्यता प्राप्त विहिरींंना कार्यारंभ आदेश द्यावेत !

By admin | Published: March 27, 2017 1:32 PM

विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

मानोरा: तालुक्यात १५ आॅगस्ट २०१५ च्या विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी सत्यजित देविदास शेरे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की मानोरा पंचायत समितीमार्फत ३९२ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या विहीरींना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या विहिरी अपूर्ण आहेत. यापैकी सुमारे १५० विहीरींना कार्यारंभ आदेश देताना रोहयोचा प्राधान्यक्रम राबविल्या गेला नाही. ज्या विहिरींना कार्यारंभ आदेश दिले. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. उर्वरित २७२ शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरींना प्रशासकीय मान्यता असली तरी, कार्यारंभ आदेश नसल्याने त्या अपूर्णच आहेत.२०१५ मध्ये ज्यांनी विहिरीसाठी अर्ज केले होते. त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये अर्ज केले. कृती आराखड्यात असणाऱ्या विहिरी रद्द होत असतील, तर प्रशासनाची पारदर्शकता कोठे आहे, पालकमंत्री सिंचन विहिर योजनेतून १ हजार विहिरींचे लक्ष तालुक्याला आहे. त्याबाबत इश्वरचिठ्ठीद्वारे लाभार्थी निवडले जात आहेत.ही प्रक्रियाही नियमानुसार होताना दिसत नाही. त्यामुळे २०१५ मध्ये ज्या विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या विहिरंींना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.