शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

फवारणीतून ५७ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:41 AM

जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने कीटकनाशक फवारणीतून शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तथापि, वेळीच उपचार घेतल्याने सर्वांची प्रकृती सुधारली.गेल्या तीन, चार वर्षांपासून शेतकरी, शेतमजुरांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटना घडत आहेतं. यात दोन वर्षांपूर्वी या प्रकारांतून काही शेतमजुरांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने राज्यभरात कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची मोहिम सुरू केली. त्याचा बराच फायदाही झाला; परंतु कृषी विभागाच्या प्रयत्नानंतरही यंदा वाशिम जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ आॅगस्टदरम्यानच्या कालावधित ५७ जणांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सकांनी या संदर्भात कृषी विभागाला माहितीही दिली असून. कीटकनाशक विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आणि आजवरच्या सर्वच बाधित रुग्णांना घरीही सोडण्यात आले. गावागावांत कृ षी विभागाकडून फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतीशाळांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी शेताच्या बांधावर या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून होणारे विषबाधेचे प्रकार घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विषबाधेचे परिणाम गंभीरकीटकनाशक फवारणीतून होणाºया विषाबाधेतून संबंधित व्यक्ती वाचल्यानंतरही त्याच्या शरीरावर कीटकनाशक औषधीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात डोळ्यांवर, मेंदूवर परिणाम होऊन अर्धांगवायू, मुत्रपिंड निकामी होऊ शकतात.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी