शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

‘ईडी’च्या चाैकशीनंतर आता वाशिम जिल्ह्यात तापणार राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 10:59 AM

Washim News : खासदार भावना गवळी यांच्या ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपाने आधीच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यात खासदारांच्या शिक्षण संस्थांची ईडीकडून चाैकशी झाल्याने आता आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असे वातावरण शिवसेनेत दिसून येत असल्याने, राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याची चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच वादंग झाले हाेते. किरीट साेमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दिवशी खासदार भावना गवळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबीयांनी ५०० काेटी रुपयांचा जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आराेप केला हाेता. या आराेप-प्रत्याराेपामुळे दरराेज राजकीय घडामाेडी सुरू झाल्यात. त्या आजतागायत सुरू असून, अचानक ३० ऑगस्ट राेजी खा.भावना गवळी यांच्या ५ संस्थांची चाैकशी ईडीकडून करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रकरणांची पाेलखाेल केल्या जाणार असल्याची चर्चा हाेत आहे. यामुळे निवडणुका नसल्या, तरी वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसून येत आहे. यापुढे ते अधिक तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप व शिवसेना लाेकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र जिल्ह्यात असून, इतर राजकीय पक्ष आपल्या कार्यात मग्न दिसून येत आहेत.

साेशल मीडिया शांतखासदार व आमदार यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आराेपांच्या फैरी दहा दिवसांपूर्वी सुरू झाल्या हाेत्या, तेव्हा साेशल मीडियावर चांगल्याच गाजत हाेत्या, परंतु ईडीने चाैकशी केल्यानंतर साेशल मीडियावर शांतता दिसून आली. दाेन्ही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काेणत्याच प्रकारची पाेस्ट पेस्ट केल्याचे दिसून आले नाही. या कारवाईने ‘कही खुशी कही गम’चे वातावरण दिसून आले असले, तरी इतर व्हाॅट्सॲप ग्रुप, फेसबुकवरही काेणी काॅमेन्टस केल्याचे दिसून आले नाही.

आराेप-प्रत्याराेप चाैकशीत विकास पडला मागेगत ११ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय आराेप-प्रत्याराेप व आता ईडीकडून चाैकशीने राजकीय वातावरण तापल्याने विकास कार्य मागे पडले आहे. या आराेप-प्रत्याराेपात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतल्याने विकास कामाऐवजी, नागरिकांच्या समस्या बाजूला सारल्या गेल्या आहेत. एकमेकांचे उणेदाणे काढण्यातच वेळ जात असल्याचे चित्र वाशिम येथील राजकारणात सद्यस्थितीत दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळी