शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

कारंजा तहसील कार्यालयासमोर ‘प्रहार’चे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:38 AM

कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव(गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद(धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत ...

कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव(गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद(धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत पीक नुकसानीबाबत ई-मेल व कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाद्वारे तक्रार देऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही. सदर बाब जिल्हाधिकारी यांच्यासमोर आणून दिली व त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्यात. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी १९ जानेवारीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अर्जुन सोडा यांच्या समवेत कृषी कार्यालयात सदर प्रकरणासंबंधी माहिती घेतली असता कंपनीच्या प्रतिनिधीने कंपनीकडून खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसानीचे प्राप्त झालेले अर्ज व झालेल्या पिकाचे पंचनामे व नुकसान भरपाई पात्र व भरपाई अदा केल्याचे एकूण सर्व शेतकऱ्यांची यादी त्यांना प्राप्त झाल्याची मेलद्वारे दाखविली. सदर यादी तपासली असता वरील गावातील शेतकऱ्यांनी ई-मेल व टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही उपरोक्त गावे सूचनापत्र यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले. सर्व पुरावेही आम्ही निवेदनासोबत संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. व त्यावरून स्पष्टपणे निदर्शनास येती की कंपनीला पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. २ महिन्यांचा कालावधी जाऊनही काही कारवाई शासन-प्रशासनाद्वारे करण्यात आलेली नाही, त्यामुळे जेव्हापर्यंत उपरोक्त गावातील शेतकरी बांधवांना पीक नुकसान मिळत नाही तेव्हापर्यंत उपाेषण सुरु ठेवण्याचा निर्धार प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.