शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पोलीस पाटलांचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:29 PM

आश्वासनाची आठवण करून देणे, हा या स्मरणपत्र आंदोलनाचा उद्देश आहे, तसेच अनेक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे.

आश्वासनाच्या पूर्ततेची मागणी: राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचा उपक्रम मानोरा: पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या आणि प्रश्नांचे  दोन महिन्यांत परिक्षण करून ते निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी २० फेब्रुवारी रोजी दिले होते; परंतु आता १८ महिने उलटले तरी, याबाबत कोणतीच पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पोलीस पाटलांच्यावतीने स्मरण पत्र आंदोलन राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेकडूनही मुख्यमंत्र्यांना बुधवारी  स्मरणपत्र पाठविण्यात आले. गतवर्षीच्या २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेमार्फत नागपूर येथे पोलीस पाटलांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले होते. पोलीस पाटलांचे मानधन, समस्या, मागण्यांचा पूर्ण अभ्यास करून दोन महिन्यांत ते निकाली काढू, असे ते म्हणाले होते. तथापि, याबाबत कोणताही निर्णय किंवा कार्यवाही होत नसल्याने पोलीस पाटील संघटनांच्यावतीने आमदार, खासदार, तसेच मंत्र्यांना गेल्या आठवड्यात निवेदने सादर करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून राज्यभरातील पोलीस पाटील संघटनांच्यावतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या आश्वासनाचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस पाटलांना सध्या तीन हजार रुपये मानधन मिळत आहे. ते किमान सात हजार पाचशे रुपये करावे, या प्रमुख मागणीसह इतरही महत्त्वाच्या मागण्या मुख्यंमंत्र्यांकडे करण्यात आल्या असल्याचे वाशिम जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शामराव राठोड यांनी सांगितले आहे. 

गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष पंढरीनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार पोलीस पाटील संघटनेतर्फे  राज्यभरातील पोलीस पाटलांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणे, हा या स्मरणपत्र आंदोलनाचा उद्देश आहे, तसेच अनेक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. यानंतरही कायद्याच्या चौकटीत राहून वेगवेगळे आंदोलन करण्यात येईल. -वासुदेव सोनोने, जिल्हा सचिव पोलीस पाटील संघटना, वाशिम