शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

By admin | Published: December 19, 2014 1:17 AM

ढगाळ वातावरणाने पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम : ढगाळ वातावरण व धुके यामुळे वातावरणात आद्र्रता तयार होते. यामुळे पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच धुक्यामुळे वातावरणातील विषारी रसायन पिकांवर पडून पिकांची शेंडे करपणे, फुले, कोवळी फळे व शेंगा गळून पडू शकतात. यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. यासंदर्भात कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतिने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.गत काही दिवसांपासून थंडी मोठय़ा प्रमाणात पडत आहे. या थंडीचा तूर पिकाला चांगला फायदा होऊ शकतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे; परंतु ढगाळ वातावरण व धुक्यामुळे तुरीसह इतरही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवते. दोन दिवसांपूर्वी वातावरणात बदल होऊन धुके पडल्याने रब्बीतील हरभरा, तूर, पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.तूर पिकांवर शेंगा धरल्यावर व्यवस्था असल्यास पाणी देणे आवश्यक आहे. यासह बड वेव्हिल,, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी,, शेंगेवरील ढेकूण, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशीची अळी या किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन किडीच्या नियंत्रणाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाबाबतही याच पध्दतीेने काळजी घेणे गरजेचे आहे. गत चार ते पाच दिवसांपासून थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गळ्याचा त्रास मोठया प्रमाणात दिसून येत आहे.