शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे!

By admin | Published: April 04, 2017 12:01 AM

शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने जलसंधारणाची कामे होणार आहेत!

वाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध स्वरूपातील जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने या निधीतून राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ३ एप्रिल रोजी दिली.जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, रिचार्ज ट्रेन्च, मातीनाला बांध, समतल सलग चर यासह इतरही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदा होऊन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटावर बहुतांशी मात करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाकडून दोन वर्षांत वाशिम जिल्ह्याला मिळालेल्या ५५.४७ कोटी रुपयांच्या निधीतून मार्च २०१७ अखेर ७.१९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नव्हता. त्यामुळे तो परत जाण्याच्या मार्गावर होता. राज्यशासनाने मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यालाही हा निधी परत देण्याचा निर्णय जाहीर केल्याने या निधीतून अर्धवट अवस्थेत असलेली तद्वतच नव्याने हाती घेतल्या जाणारी जलसंधारणाची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.