शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 जमिनीअभावी रखडला शिरपूरचा सौर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:28 IST

अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. 

ग्रामपंचायतकडे जागेची मागणी : महावितरणने दिले पत्रलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : वारंवार खंडीत होणाºया वीजपुरवठ्याच्या समस्येतून शेतकºयांची सुटका करण्यासाठी महावितरणने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीची तयारी केली आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतकडे साधारण १ हेक्टर ई-क्लास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तथापि, अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. रब्बी हंगामात शेतकºयांना वीज पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. विजेचा तूटवडा असल्याने ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकºयांना भारनियमनाच्या संकटाचा सामना करावा लागतो. भारनियमनाच्या काळात आठवड्यात तीन ते चार दिवस रात्री सिंचनासाठी वीज पुरवठा केला जातो.  हा प्रकार शेतकºयांसाठी त्रासदायक व धोकादायक ठरतो. त्यातही विज पुरवठा सुरू होताच त्यात बिघाड होण्याच्या घटना नेहमी घडतात. या समस्येवर पर्याय म्हणून शासन शेतकºयांच्या हितासाठी सौर प्रकल्प निर्मितीसाठी पुढाकार घेत आहे. या अंतर्गत ०.५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीकरीता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १ हेक्टर, तर १.०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीसाठी २ हेक्टर जमीन आवश्यक आहे. शिरपूर येथील शेती व शेतकरी संख्या लक्षात घेता येथे १ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज आहे. महावितरणने तसा आराखडाही तयार केला आहे. आता या प्रकल्पासाठी २ हेक्टर जमीन उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिरपूर येथे शेकडो हेक्टर ई क्लास जमीन आहे. काही जमिनीवर अतिक्रमणही करण्यात आले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सौर प्रकल्प निर्मितीसाठी जमीन दिल्यास शिरपूर येथील शेतकºयांची भारनियमनाच्या समस्येतून सुटका होणार आहे. तथापि, अद्याप ही जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन