शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; शेतकरी चिंतातूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 4:08 PM

सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील १४ दिवसात जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सतत पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले. सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादनात घट तर येणार नाही ना? अशी भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने शेती मशागतीची कामे पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. पाणंद रस्त्यांवर चिखल झाल्याने गैरसोय होत आहे.यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. आॅगस्ट महिन्यात ९ ते २० या दरम्यान संततधार पाऊस झाल्याने याचा सर्वाधिक फटका मूग पिकाला बसला. शेतातच शेंगा फुटत असल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक पिवळे पडत आहे. सोयाबीन पिक पिवळे पडणे हा आजार तर नाही ना? याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही शेतकºयांमधून होत आहे. नदी, नाल्याकाठच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ‘अतिवृष्टी’ नसल्याचे कारण समोर करून संबंधित यंत्रणेने अद्याप पिकांचे पंचनामे केले नाहीत.

शेती मशागतीची कामे पूर्ववतमागील १४ ते १५ दिवस सतत पाऊस असल्याने शेती मशागतीची कामे प्रभावित झाली होती. २१ आॅगस्टपासून पावसाने उघडीप दिल्याने किटकनाशक फवारणी, मूग सोंगणी यासह अन्य शेतीविषयक कामे पूर्ववत होत आहेत. पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतात जाताना शेतकºयांची दमछाक होत आहे. पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मजबूतीकरण करण्याची मागणी वेळावेळी करण्यात आली. परंतू, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस